⁠  ⁠

भारत रत्न | Bharat Ratna

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 4 Min Read
4 Min Read

भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करून घेण्यात आली. त्यानंतर १२ जणांना मरणोपरांत भारतरत्न दिले गेलेले आहे. आत्तापर्यंत ४६ जणांना हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत.

२ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला.

१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेवून नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्युचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता.

पुरस्काराचे स्वरूप

Bharat_Ratnaसुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतीमा, त्याच्या वरच्या बाजूला हिंदी भाषेत ‘भारतरत्न’ असे लिहिलेले असे व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी. तसेच पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे प्रतिकचिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीदवाक्य (motto) असावा. अशी एक कल्पना पुढे आली होती. पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जात सद्ध्या दिले जाणारे स्मृतीचिन्ह पक्के करण्यात आले. सध्याचे ‘भारतरत्न’ पुरस्काराचे स्वरुप म्हणजे एका सोनेरी पिंपळपानावर एका बाजूला मधोमध सूर्यप्रतीमा व तिच्याखाली ‘भारतरत्न’ असे शब्द व दुसऱ्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह “चौमुखी सिंहाची प्रतीमा’ अशा प्रकारचे पदक आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना Indian Order of Precedence मध्ये स्थान मिळते.

 

क्रमांक नाव वर्ष
१. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५) १९५४
चक्रवर्ती राजगोपालचारी (१८७८-१९७२) १९५४
३. डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण (१८८८-१९७०) १९५४
४. डॉ. भगवान दास (१८६९-१९५८) १९५५
५. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१८६१-१९६२) १९५५
६. जवाहरलाल नेहरू (१८८९ -१९६४) १९५५
७. गोविंद वल्लभ पंत (१८८७-१९६१) १९५७
८. डॉ. धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) १९५८
९. डॉ. बिधान चंद्र रॉय (१८८२-१९६२) १९६१
१०. पुरूषोत्तम दास टंडन (१८८२-१९६२) १९६१
११. डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३) १९६२
१२. डॉ. झाकिर हुसेन(१८९७-१९६९) १९६३
१३. डॉ. पांडुरंग वामन काणे (१८८०-१९७२) १९६३
१४. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) (१९०४-१९६६) १९६६
१५. इंदिरा गांधी (१९१७-१९८४) १९७१
१६. वराहगिरी वेंकट गिरी (१८९४-१९८०) १९७५
१७. के. कामराज (मरणोत्तर) (१९०३-१९७५) १९७६
१८. मदर तेरेसा (१९१०-१९९७) १९८०
१९. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (१८९५-१९८२) १९८३
२०. खान अब्दुल गफार खान (१८९०-१९८८) १९८७
२१. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (१९१७-१९८७) १९८८
२२. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) (१८९१-१९५६) १९९०
२३. नेल्सन मंडेला (जन्म १९१८) १९९०
२४. राजीव गांधी (मरणोत्तर) (१९४४-१९९१) १९९१
२५. सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर) (१८७५-१९५०) १९९१
२६. मोरारजी देसाई (१८९६-१९९५) १९९१
२७. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) (१८८८-१९५८) १९९२
२८. जे. आर. डी. टाटा (१९०४-१९९३) १९९२
२९. सत्यजित रे (१९२२-१९९२) १९९२
३०. सुभाषचंद्र बोस (१८९७-१९४५) (नंतर परत घेतले) १९९२
३१. ए. पी. जे. अब्दुल कलाम (जन्म १९३१) १९९७
३२. गुलझारीलाल नंदा (१८९८-१९९८) १९९७
३३. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर)(१९०६-१९९५) १९९७
३४. एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९१६-२००४) १९९८
३५. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् (१९१०-२०००) १९९८
३६. जयप्रकाश नारायण (१९०२-१९७९) १९९८
३७. रवी शंकर (जन्म १९२०) १९९९
३८. अमर्त्य सेन (जन्म १९३३) १९९९
३९. गोपीनाथ बोरदोलोई‎ (जन्म १९२७) १९९९
४०. लता मंगेशकर (जन्म १९२९) २००१
४१. बिसमिल्ला खान (१९१६-२००६) २००१
४२. भीमसेन जोशी (१९२२-२०११) २००८
४३. सी.एन.आर.राव (जन्म १९२९) २०१३
४४. सचिन तेंडूलकर (जन्म १९७३) २०१३
४५. मदनमोहन मालवीय (जन्म १८६१) २०१४
४६. अटलबिहारी वाजपेयी (जन्म १९२४) २०१४

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- Mission MPSC

Share This Article