---Advertisement---

अनाथ आश्रमात बालपण गेलं, पण जिद्दीने नारायण इंगळे झाला वनक्षेत्रपाल !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : आपली परिस्थिती बदलणं हे आपल्याच हातात असतं. कितीतरी वेळा अपयश आणि अडचणी आल्या तरी हरून जगायचं सोडायचं नाहीतर लढायला हवं.‌ याचं उदाहरण म्हणजे नारायण इंगळे. एमपीएससी मधून हजारो मुलांची दरवर्षी निवड होते. परंतू नारायण यापेक्षा वेगळा आहे.नारायण हा मूळचा लातूरचा लेक….तो लहानपणी पोलिसांना रेल्वेस्टेशन वर मिळाला.

त्यानंतर जालना येथील बाल न्यायालयाने रिमांड होम मध्ये ठेवले गेले. लातूरला बाल सुधार गृह येथे त्याने पहिले ते दहावी शिक्षण पूर्ण केले. आपण शिक्षण घेतले पाहिजे या जिद्दीने त्याने पुढील इंजिनीअरिंगचे शिक्षण औरंगाबादला समाजकल्याण होस्टेमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.नारायण एका कार्यालयात मानधनावर काम करत होता. काम आणि अभ्यास यातील तो समन्वय साधत होता.

त्याने अहोरात्र मेहनत घेतली आणि अभ्यासाची वाट धरली. यात तो खूपदा अपयशी ठरला. पण पुन्हा अभ्यासाला सुरुवात करून त्याला यश मिळाले. त्याची वनक्षेत्रपाल पदी निवड झाली.अनाथ आरक्षणाचा पहिला अधिकारी व लाभार्थी देखील ठरला आहे‌.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts