---Advertisement---

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा ! राज्यात ८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

”कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता राज्यातील सर्वच विभागातील रिक्त जागांची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे १५ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी ८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

उर्वरित पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परीक्षांबाबत कोणताही गोंधळ आता होणार नाही. वर्षभरात सर्व रिक्त पदे भरली जाऊन नेमणुकाही दिल्या जाणार असल्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.

---Advertisement---

अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांचे संयुक्त विद्यामाने आयोजित स्पर्धा परीक्षा वास्तव, भवितव्य आणि दिशा या विषयावर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमीत्ताने दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now