---Advertisement---

एकवेळचे खायला देखील जेवण नव्हते, चिकाटीच्या जोरावर बनले शास्त्रज्ञ! वाचा प्रेरणादायी प्रवास

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

महाराष्ट्रातील गडचिरोली येथील दुर्गम खेडेगावातला संघर्ष ते अमेरिकेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ होण्यापर्यंतचे भास्कर हलामी यांचे जीवन कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

चिराचडी गावातील आदिवासी समुदायात वाढलेला अवलिया आता मेरीलँड, यूएसए मधील बायोफार्मास्युटिकल कंपनी संशोधन आणि विकास विभागात एक वरिष्ठ शास्त्रज्ञ आहे. जे अनुवांशिक औषधांमध्ये संशोधन करतात आणि आर.एन.ए मध्ये निर्मिती आणि संश्लेषणाचे काम पाहतात.

भास्कर यांना हा एक यशस्वी शास्त्रज्ञ होण्याचा प्रवास अनेक अडथळ्यांनी भरलेला आहे. चिराचडी या गावातील ते पहिले विज्ञान पदवीधर ठरलेत. तर पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी मिळवणारे गावातील पहिले व्यक्ती आहेत.
त्यांचे बालपण अत्यंत कमी उत्पन्नावर जगले. इतकेच नाहीतर एक वेळचे जेवण मिळवण्यासाठीही त्यांना खूप संघर्ष करावा लागला.

त्याकाळी त्यांच्या कुटुंबाकडे पीक नव्हते आणि त्यांच्या लहान शेतात कोणतेही काम नव्हते. तरी देखील ते खचले नाहीत. ते महुआची फूले शिजवायचे, ती फूले खाऊन दिवस काढायचे. जी पचायला देखील सोपी नसायची. इतकेच ते नाही तर परसोड (जंगली तांदूळ) गोळा करायचे आणि तांदळाचे पीठ पाण्यात (अंबील) भिजवून घ्यायचे. ते शिजवून प्यायचे आणि पोट भरायचे. ही फक्त त्यांच्या घराची गोष्ट नाही, तर त्यांच्या चिरचडी गावातील ९० टक्के लोकांना अशा प्रकारे जगावे लागायचे. जिथे जवळपास ४०० ते ५०० कुटुंबे राहत होती. काही महिन्यांनी कसनसूर येथील भास्कर यांच्या वडिलांना स्वयंपाकी म्हणून नोकरी, जिथे ते संपूर्ण कुटूंब शिफ्ट झाले.

भास्कर हलामी यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण कसनसूर येथील आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत झाले. त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर यवतमाळमधील शासकीय विद्यानिकेतन केळापूर येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे गडचिरोलीतील एका महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर, भास्कर यांनी नागपूरच्या विज्ञान संस्थेतून रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर २००३ मध्ये भास्कर यांची नागपूर येथील प्रतिष्ठित लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (LIT) येथे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी संशोधनावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत पीएचडीचे शिक्षण घेतले. याच मेहनतीच्या जोरावर त्यांची संशोधनासाठी डीएनए आणि आरएनएची निवड केली. पुढे जाऊन त्यांना मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून पीएचडी प्राप्त केली. ते त्यांच्या भारत भेटींमध्ये आश्रम शाळा, महाविद्यालयांना भेट देतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी भेटतात आणि त्यांना करिअर आणि त्यांचे ध्येय साध्य करण्याच्या मार्गांबद्दल सल्ला देतात. सध्या आदिवासी विकास विभागाने ‘ए टी विथ ट्रायबल सेलिब्रिटी’ कार्यक्रम सुरू केला, ज्यामध्ये भास्कर हलामी हे पहिले सेलिब्रिटी ठरले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts