रेल्वे अपघातात दोन्ही पाय आणि एक हात गमावले ; पण जिद्दीने IAS पद कमावले!

Published On: डिसेंबर 19, 2023
Follow Us

UPSC IAS Success Story आपण कोणतेही संकट आले तरी घाबरून जातो पण त्यावर मात करत यश गमवायला धमक लागते.आपल्या अडचणींपुढे हात टेकणाऱ्या अनेकांसमोर सूरज तिवारीने एक उदाहरण ठेवलं आहे. कितीही समस्या आल्या तरी प्रयत्न केल्यास यश नक्की मिळतं हे त्याने दाखवून दिलं आहे. त्यांनी मेहनतीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर युपीएससीच्या परीक्षेत ९१७ क्रमांक पटकावला आणि आय.ए.एस अधिकारी झाला.

त्याचे वडील शिलाईचा छोटेखानी व्यवसाय करतात. अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या सूरजने कष्टाची जाणीव ठेवली. त्याचे शालेय शिक्षण हे महर्षी परशुराम शाळेत झाले.तर त्याने मैनपुरी मधून दहावी – बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली.लहानपणापासूनच हुशार सूरज तिवारी अभ्यासासोबत यूपीएससीची तयारी करत राहिला. पण२४ जानेवारी २०१७ रोजी दादरी-गाझियाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातात सुरजने त्याचे दोन्ही पाय, उजव्या आणि डाव्या हाताची बोटे गमावली होती.

यानंतर तो चार महिने रुग्णालयात राहिले, त्यानंतर तीन महिने घरीच विश्रांती घेतली. यानंतरही सुरजने हार मानली नाही. अपघातानंतर २०१८ मध्ये त्याने जेएनयू दिल्लीत बी.एमध्ये नव्याने प्रवेश घेतला. तेथून २०२१ साली बी. ए पास करून एम.एला प्रवेश घेतला.या सोबत युपीएससीचा देखील अभ्यास चालू ठेवला. त्याने मेहनत करत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे यश संपादित केले आहे. अखेर, तो‌ आय.ए.एस अधिकारी झाला.

मित्रांनो, तुम्ही देखील कोणत्याही परिस्थितीत हिंमत हारू नका. प्रयत्न करत रहा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025