---Advertisement---

शेतकऱ्याच्या मुलगाची गगनभरारी; युपीएससीच्या परीक्षेत मिळविले यश..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story युपीएससी देणाऱ्या इच्छुकांमध्ये, असे अनेक आहेत ज्यांना दिल्लीत कोचिंग किंवा भाडेही परवडत नाही. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील इच्छुकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनेक अडथळ्यांवर मात करावी लागते. शेवटी, जे चिकाटीने आणि सर्व अडचणींशी लढा देतात ते त्यांचे आयएएस किंवा आयपीएस बनण्याचे स्वप्न पूर्ण करतात. असाच उत्कर्ष गौरव. शेतकऱ्याचा मुलगा असण्यापासून ते युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंतची ही यशोगाथा…

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम महत्त्वाचे असते. उत्कर्ष गौरव हा मूळचा अमरगाव, बिहारचा रहिवासी. उत्कर्षने बारावीचे शिक्षण गावातच पूर्ण केले. पुढे, मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी मिळवली. पदवी घेतल्यानंतर उत्कर्ष सरकारी नोकरीसाठी तयारी करू लागला. त्याची आई गृहिणी आहे, तर उत्कर्षचे वडील शेतकरी म्हणून काम करतात. २०१८ मध्ये बी. टेक पदवी मिळवल्यानंतर त्याचा या क्षेत्रातील खरा प्रवास सुरू झाला. पण पहिल्या प्रयत्नात यूपी एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाला नाही. साथीच्या रोगाच्या उद्रेकामुळे कोविड व लॉकडाऊन दरम्यान त्याला त्याच्या गावी परत जावे लागले. इंजिनिअर करूनही नोकरी नाही… बेरोजगारी यामुळे त्याला ळे सामाजिक दबावाला सामोरे जावे लागले.

---Advertisement---

त्यानंतर त्याने आपल्या गावातून परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्याचा दिल्लीतील राहण्याचा खर्च कमी करू शकला. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्याने सोशल मीडिया वापरणं बंद केले होती. तो गावात राहत असताना यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी फक्त यूट्यूबचा वापर करत असे. त्याआधारे विविध लेक्चरचे मार्गदर्शन घेत असे.

मात्र, खूप मेहनत करूनही त्याला यूपीएससी परीक्षेत सलग तीन वेळा अपयशाला सामोरे जावे लागले. अभियांत्रिकीनंतर बेरोजगार असल्याने त्याला गावकऱ्यांचे टोमणे सहन करावे लागले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अधिक मेहनत करण्यास प्रोत्साहन दिले. शेवटी, उत्कर्षच्या चिकाटीला २०२२मध्ये यश मिळाले जेव्हा त्याने UPSC CSE परीक्षेत AIR-७०९वा रॅंक मिळवला. अखेर, उत्कर्षच्या चिकाटीचे फळ मिळाले,

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts