⁠  ⁠

महाराष्ट्रातील तलाठी भरतीबाबत महत्वाची अपडेट

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

महाराष्ट्रातील तलाठी भरतीसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आलीय. राज्यात चार हजाराहून अधिक तलाठी पदांची भरती होणार आहे. या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून त्याचे आदेश राज्य सरकारने काढले असून, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर या विभागांतील सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदे एकाचवेळी भरण्यात येणार आहे.

राज्याच्या विविध सरकारी विभागांत अनेक वर्षांपासून ‘गट क’ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. तलाठ्यांची पदे वाढण्याची शक्यता असून, सध्या चार हजार पदे भरण्याच्या प्रक्रियेस सरकारने मान्यता दिली आहे.

लवकरच भरतीचा कार्यक्रम
राज्य सरकारने महसूल विभागातील तलाठी पदाच्या भरतीसाठी नियुक्त केलेल्या समन्वयक अधिकाऱ्यांकडून रिक्त जागांचा आढावा घेतला जाणार आहे. या पदभरतीसाठी ऑनलाइन परीक्षा लवकरच घेतली जाणार असून, त्यासाठी कार्यक्रम पुढील काही दिवसांत जाहीर होणार आहे. भरतीसाठी आवश्यक जाहिरातही लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. परीक्षेसाठी निवड केलेल्या कंपनीसोबत पद भरतीबाबत सामजस्य करार करणे, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे नियोजन, परीक्षेचा निकाल, शिफारस झालेल्या आणि न झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल; तसेच उमेदवारांकडून पदभरती संबंधी आक्षेप व तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा तांत्रिक पदभरती संबधित इतर अनुषंगिक कामे पूर्ण करण्यात येतील.

अर्ज करताना उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांदरम्यान असावे. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.
तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५,२०० रुपये ते २० हजार २०० रुपये पगा दिला जाणार आहे.

यासाठी जानेवारी २०२३ पासून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करताना उमेदवारांना जीमेल अकाऊंटची मदत घ्यावी लागेल. पूर्ण अर्ज भरल्यावर अर्जाची प्रिंट देखील जीमेलवर उपलब्ध होणार आहे.

Share This Article