भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीच्या टस्कनी प्रांतातील बोर्गो फिनेशिटो रिसॉर्टमध्ये सोमवारी विराट-अनुष्का यांचा विवाहसोहळा पार पडला. सचिन-शाहरुखसह ५० लोकांनाच निमंत्रण होते. फक्त १०० लोकसंख्येच्या बिबिआनो गावातील हे रिसॉर्ट जगातील दुसरे सर्वात महागडे आहे. डिसेंबरमध्ये ते बंद असते. पण, या लग्नासाठी खास सुरू ठेवण्यात आले. २१ डिसेंबरला दिल्ली व २६ ला मुंबईत स्वागत समारंभ होईल. लग्नानंतर हे नवदाम्पत्य आता द.आफ्रिकेला रवाना होणार आहेत. येथे विराट त्याच्या आगामी सामन्यांची तयारी करेल. तर अनुष्का त्यावेळी त्याच्यासोबत नववर्षाचा आनंद साजरा करेल. यानंतर हे दोघे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात परतणार आहेत. भारतात परतल्यानंतर अनुष्का आनंद एल रायच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुरुवात करेल. त्याचसोबत ती ‘सुई-धागा’ चित्रपटासाठीही तयारी करेल. वरुण आणि अनुष्का फेब्रुवारीमध्ये चित्रीकरणाला सुरुवात करतील. अनुष्काचा ‘परी’ चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असल्याने त्याच्या प्रमोशनमध्येही अनुष्का बिझी होणार आहे.
LATEST Post
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत पदवीधरांना नोकरीची संधी; 225 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 9, 2026
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 2536 जागांसाठी भरती ; 12वी उत्तीर्णांना संधी
Published On: सप्टेंबर 9, 2026
RCFL मार्फत 326 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 5, 2026
बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी 1100 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 5, 2026
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1748 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 3, 2026
बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 205 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 2, 2026
IBPS मार्फत 13,706 जागांसाठी महाभारती; पदवीधरांना नोकरीची संधी
Published On: सप्टेंबर 1, 2026
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात सरकारी नोकरी संधी ; 376 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 29, 2026















