⁠  ⁠

कर्मचारी राज्य बीमा निगम महाराष्ट्रमध्ये ५९४ जागांसाठी भरती, 10वी ते ग्रेजुएट्स पाससाठी संधी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

कर्मचारी राज्य बीमा निगममध्ये विविध पदांच्या ५९४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२२ आहे.  ही भरती महाराष्ट्र प्रदेशासाठी आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी आहे.

एकूण जागा : ९५४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) अप्पर डिव्हिजन क्लर्क (युडीसी)- ३१८
शैक्षणिक पात्रता : उमेदवार सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्सचे कार्य ज्ञान देखील असले पाहिजे ज्यामध्ये office suites आणि databases चा वापर देखील समाविष्ट असेल.

२) लघुलेखक (स्टेनो.)- १८
शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12वी पास किंवा मान्यताप्राप्त बोर्ड आणि विद्यापीठातून समकक्ष असणे आवश्यक आहे.

३) मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस)- २५८
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि मंडळातून मॅट्रिक (SSC) किंवा समतुल्य उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२२ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी :  ५००/- रुपये [SC/ST/PWD/ विभागीय उमेदवार, महिला/ माजी सैनिक – /- रुपये] शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) अप्पर डिव्हिजन क्लर्क (युडीसी)- २५,५०० ते ८१,१०० /-
२) लघुलेखक (स्टेनो.)- २५,५०० ते ८१,१०० /-
३) मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस)- १८,००० ते ५६,९००/-

निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि संगणक कौशल्य चाचणी

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ फेब्रुवारी २०२२

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी  : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

Share This Article