⁠  ⁠

चालू घडामोडी : २५ ऑगस्ट २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs : 25 August 2020

देशातील ४० टक्के खनिज झारखंडमध्ये; ५० वर्षे पुरेल कोळशाचा साठा

  • कोळसा साठ्यात झारखंडला देशात पहिला क्रमांक, लोखंडामध्ये दुसरा, तांब्यात तिसरा क्रमांक आहे.
  • देश खनिजासाठी बहुतांशी झारखंडवर अवलंबून आहे. कारण, येथे ४०% खनिज साठा आहे. झारखंडमधील कोळसा साठा ५० वर्षे पुरेल, तर युरेनियम २० वर्षांपर्यंत आणि तांब्याचे खनिज २५ वर्षांपर्यंत झारखंडमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
  • सोन्याच्या नव्या खाणीही सापडत आहेत. आयआयटी आयएसएम धनबादच्या संशोधनात आढळून आले की, झारखंडला ५० वर्षांपर्यंत खनिजांची कमतरता भासणार नाही.
  • तरीही झारखंडची जीडीपी देशात १९ व्या क्रमांकावर आहे. तर उत्खननात झारखंडच्या मागे मध्य प्रदेश नवव्या, राजस्थान १० व्या आणि छत्तीसगड १८ व्या क्रमांकावर आहे.

मुंबई विमानतळातील 74 टक्के हिस्सा खरेदी:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली होती.
  • सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने यापूर्वीच दिली.
  • आता देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या विमानतळाच्या देखबालीचे आणि हाताळणीचे कंत्राट गौतम अदानी यांच्या समुहाला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
  • अदानी समुहाचा जीव्हीके समुहासोबत असलेला वाद शमल्यानंतर मुंबई विमानतळातील 74 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
  • सध्या मुंबई विमानतळाच्या देखभालीचं आणि हाताळणीचं कंत्राट जीव्हीके समुहाकडे आहे.

इशांत शर्मा आणि दिप्ती शर्माचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड

  • भारतीय कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्माची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
  • 31 वर्षीय इशांत शर्मा सध्या आयपीएलच्या निमीत्ताने युएईत आहे.
  • गेल्या 13 वर्षांच्या अथक मेहनतीचं फळ मला अर्जुन पुरस्काराच्या माध्यमातून मिळालं असल्याचं इशांत म्हणाला.
  • इशांतसोबत भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू दिप्ती शर्माचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

ब्रह्मपुत्र नदीवर देशातील सर्वात मोठा रिव्हर रोपवे

  • गुवाहाटीमध्ये सोमवारी देशातील हा सर्वात मोठा रिव्हर रोप वे देशाला अर्पित करण्यात आला.
  • हा रोपवे ब्रह्मपुत्र नदीवरील दोन किनाऱ्यांना एकमेकांशी जोडणार आहे.
  • या रोप वेच्या बांधणीसाठी ५६ कोटी रुपये खर्च आला आहे. हा रोप वे सुमारे १.८ किमी लांबीचा आहे.
  • या रोपवेमुले उत्तर गुवाहाटी आणि शहराचया मध्य भागातील प्रवासाच्या वेळेत मोठी घट होऊन ती केवळ ८ मिनिटांवर आली आहे.
  • २००३ पासून या रोपवेच्या कामास सुरुवात झाली होती. या रोपवेच्या एका केबिनमधून ३० प्रवासी प्रवास करू शकतात.

Share This Article