भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने सोमवारी श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात मिळवलेल्या विजयात सर्वांत वेगवान ३०० बळी घेण्याचा डेनिस लिलीचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज लिलीने १९८१ मध्ये ५६ कसोटी सामन्यांत हा विक्रम नोंदवला होता. ३६ वर्षांनंतर आश्विनने या विक्रमाला गवसणी घातली. आश्विनने विक्रमी कामगिरी करताना अनेक दिग्गजांना पिछाडीवर सोडले. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (५८ कसोटी), रिचर्ड हॅडली, माल्कम मार्शल व डेल स्टेन (६१ कसोटी) यांचा यात समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा अश्विन भारताचा पाचवा गोलंदाज आहे. त्याच्यापेक्षा अधिक बळी घेणा-या गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे (६१९), कपिलदेव (४३४), हरभजन सिंग (४१७) आणि झहीर खान (३११) यांचा समावेश आहे.
LATEST Post
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1748 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 3, 2026
बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 205 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 2, 2026
IBPS मार्फत 13,706 जागांसाठी महाभारती; पदवीधरांना नोकरीची संधी
Published On: सप्टेंबर 1, 2026
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात सरकारी नोकरी संधी ; 376 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 29, 2026
भारतीय डाक विभागात 23,757 जागांसाठी मेगाभरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
Published On: ऑगस्ट 28, 2026
भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीची उत्तम संधी! तब्बल 4029 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 20, 2026
NTPC ग्रीन एनर्जी लि. मध्ये 147 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 19, 2026
पुणे आयकर विभागात विविध पदांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 18, 2026















