महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यांमधील बढत्यांमध्ये अनुसूचित जाती (एससी) (१३ टक्के), अनुसूचित जमाती (एसटी) (७ टक्के) आणि भटके विमुक्त जमाती (एनटी) व विशेष मागासवर्गीय (एसबीसी) (१३ टक्के) प्रवर्गांतील कर्मचाऱ्यांसाठी १३ वर्षांपूर्वी दिलेले आरक्षण आणि त्यानुसार झालेल्या नेमणुका यांचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या अभिप्रायावर अवलंबून आहे. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात २००४मध्ये बढत्यांमध्ये हे आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याला अनेकांनी याचिकांद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर ऑगस्ट-२०१७मध्ये बहुमताच्या आधारे निकाल देताना उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय अवैध ठरवला होता. उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने तसेच ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉइज फेडरेशन (एआयबीसीईएफ) व अन्य संघटनांनी दाद मागितली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ मूळ याचिकादार विजय घोगरे व अन्य काहींनी अर्ज केले आहेत. त्याविषयी बुधवारी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
LATEST Post
महानदी कोलफील्ड्स लि.मार्फत विविध पदांच्या 500 जागांसाठी भरती
Published On: मे 8, 2026
मोठी बातमी! MPSC मार्फत लवकरच तलाठी पदांच्या 1700 जागा भरल्या जाणार
Published On: मे 6, 2026
भारतीय लष्करात 10वी उत्तीर्णांना संधी; 190 जागांसाठी भरती
Published On: मे 4, 2026
MPSC मार्फत विविध पदांच्या 552 जागांसाठी भरती ; पदवीधरांना मोठी संधी (मुदतवाढ)
Published On: मे 4, 2026
भारतीय रिझर्व्ह बँकेत सरकारी नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती
Published On: मे 2, 2026
राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये नोकरीची संधी; 188 जागांसाठी भरती सुरु
Published On: मे 2, 2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत 407 जागांसाठी भरती
Published On: एप्रिल 28, 2026
आदिवासी विकास विभागात 416 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण, पगार 47600 पर्यंत
Published On: एप्रिल 28, 2026













