महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यांमधील बढत्यांमध्ये अनुसूचित जाती (एससी) (१३ टक्के), अनुसूचित जमाती (एसटी) (७ टक्के) आणि भटके विमुक्त जमाती (एनटी) व विशेष मागासवर्गीय (एसबीसी) (१३ टक्के) प्रवर्गांतील कर्मचाऱ्यांसाठी १३ वर्षांपूर्वी दिलेले आरक्षण आणि त्यानुसार झालेल्या नेमणुका यांचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या अभिप्रायावर अवलंबून आहे. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात २००४मध्ये बढत्यांमध्ये हे आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याला अनेकांनी याचिकांद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर ऑगस्ट-२०१७मध्ये बहुमताच्या आधारे निकाल देताना उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय अवैध ठरवला होता. उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने तसेच ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉइज फेडरेशन (एआयबीसीईएफ) व अन्य संघटनांनी दाद मागितली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ मूळ याचिकादार विजय घोगरे व अन्य काहींनी अर्ज केले आहेत. त्याविषयी बुधवारी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
LATEST Post
ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी खुशखबर ! IBPS मार्फत 7365जागांसाठी भरती जाहीर
Published On: जुलै 22, 2026
इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांसाठी भरती
Published On: जुलै 22, 2026
नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांच्या 259 जागांसाठी भरती
Published On: जुलै 18, 2026
नॅशनल इन्शुरन्स कंपनीत 500 पदांसाठी भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना नोकरीची संधी
Published On: जुलै 18, 2026
ठाणे महानगरपालिकेत मेगाभरती
Published On: जुलै 18, 2026
पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 6777 जागांसाठी मेगाभरती
Published On: जुलै 16, 2026
भारतीय रेल्वेत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! सेक्शन कंट्रोलर पदासाठी मोठी पदभरती
Published On: जुलै 15, 2026
NTPC ग्रीन एनर्जी लि.मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती
Published On: जुलै 14, 2026















